कोक्रोच जनता पार्टीच्या कथित संसद मोर्चादरम्यान आंदोलकांनी केलेला हिंसाचार न दाखवता केवळ पोलिसांची कठोर कारवाई पाहणाºयांना वगळता सर्वांना दिसला. या संसद मोर्चादरम्यान हिंसाचार घडला, कारण जमाव अनियंत्रित होता आणि त्यात विद्यार्थी तसेच अराजकतावादी सामील होते. या घटकांना मनमानीपणे वागण्याची संधी मिळाली, कारण संसद मोर्चाचे नेतृत्व किंवा मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हते. दिल्लीच्या रस्त्यांवर गोंधळ आणि हिंसाचार सुरू असताना, सीजेपीचे दोन नेते केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात व्यस्त होते.
हे निवेदन देण्यासाठी त्यांना चार तासांहून अधिक वेळ लागला. उर्वरित नेत्यांपैकी एक जण बर्गर खायला गेला, तर जे उपस्थित होते त्यांनी कोणत्याही परिस्थितीत जमावाला संसदेपर्यंत नेण्याचा निर्धार केला होता. ते जवळजवळ यशस्वी झाले होते, परंतु या सक्तीच्या प्रयत्नात मोठ्या संख्येने पोलीस आणि आंदोलक जखमी झाले. आंदोलनादरम्यान डझनभर वाहनांचे नुकसान झाले, यावरून हे दिसून येते की, जमावात हिंसाचार भडकवणारे आणि तयारी करून आलेले लोक होते. जेव्हा जमावात असे घटक उपस्थित असतात, तेव्हा हिंसाचार टाळणे अशक्य असते. दिल्लीत हेच घडले आहे. गेल्या सात वर्षांत तिसºयांदा हे घडले आहे. सीजेपीच्या संसद मोर्चादरम्यान पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला हे खरे असले तरी, जमावाने अराजकता माजवली आणि जोरदार दगडफेक केली हेही तितकेच खरे आहे. हे स्पष्ट आहे की, पोलीस जमावाचा आकार किंवा त्यांच्या हेतूंचा अंदाज लावू शकले नाहीत. २०१९-२० मधील शाहीन बाग धरणे आंदोलनादरम्यान आणि २०२१ मधील शेतकºयांच्या आंदोलनादरम्यान, विशेषत: प्रजासत्ताकदिनी काढलेल्या त्यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी अशाच प्रकारच्या घटना घडल्या. या प्रत्येक वेळी बाहेरच्या शक्ती, दहशतवादी शक्ती, खलिस्थानी दहशतवादी असल्याचे दिसून आले. तशीच ताकद इथेही सोमवारी दिसली हे नाकारता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेतला.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) शाहीन बागमध्ये एक मुख्य रस्ता अडवून जवळपास शंभर दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राजधानीत असताना या आंदोलनामुळे दिल्लीत मोठी दंगल उसळली. या दंगलीतील पहिला बळी कॉन्स्टेबल रतन लाल यांचा होता. आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्यासह ५०हून अधिक लोक मारले गेले. आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांना अलीकडेच त्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. याच ताहीरला माध्यमांच्या एका गटाकडून आणि इतर अनेकांकडून निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. २६ जानेवारी रोजी शेतकºयांच्या आंदोलनादरम्यान दिल्लीत कथित शेतकºयांनी ट्रॅक्टर रॅली काढली तेव्हाही अशीच प्रमाणपत्रे वाटण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या बेबंद ट्रॅक्टरस्वारांनी लाल किल्ल्यावर हल्ला चढवला. त्यावेळी जवळपास शंभर पोलिसांना मारहाण करण्यात आली. तरीही, मोदी सरकार, पोलीस आणि प्रशासनासह, त्या अनियंत्रित जमावापुढे हतबल दिसले.
म्हणूनच हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, शाहीन बाग येथील धरणे आंदोलन आणि शेतकरी आंदोलकांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काहीही केले नाही. न्यायालयाने जे काही केले, त्यामुळे समस्या अधिकच वाढली. शाहीन बाग येथील आंदोलकांशी वाटाघाटी करण्यासाठी न्यायालयाने एक समिती स्थापन केली. त्याचप्रमाणे, तीन कृषी कायद्यांची कायदेशीरता न तपासता त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. यातून आंदोलकांना आणि त्यांच्या समर्थकांना असा संदेश गेला की, त्यांची भूमिका योग्य आहे, आणि त्यानंतर त्यांनी जवळपास एक वर्ष दिल्लीला ओलीस ठेवले. जेव्हा मजबूत मानल्या जाणाºया मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली, तेव्हाच ते परतले. यावेळी काय होईल हे सांगणे कठीण आहे, कारण सीजेपी समर्थक अजूनही जंतरमंतरवर जमलेले आहेत. त्याच वेळी, पंजाबच्या शेतकरी संघटनांना अचानक जाणवले की, अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापार करारात त्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, आणि त्यामुळे ते दिल्लीला जाण्यास उत्सुक झाले.
संसद अधिवेशन सुरू असताना, विरोधकांना नीट पेपरफुटी प्रकरणाव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे. आता त्यांच्यासमोर एक नवीन मुद्दा आहे. सीजेपी संसद मोर्चादरम्यान झालेला हिंसाचार. विरोधकांना ही संधी मिळाली, कारण सरकारने सुरुवातीला जंतरमंतर येथील आंदोलनाकडे दुर्लक्ष केले होते आणि ज्या दिवशी संसद अधिवेशन सुरू होणार होते, त्या दिवशी त्यांना कॉक्रोज जनता पार्टीच्या नेत्यांशी बोलण्याची गरज आठवली. हे आधी का केले गेले नाही, आणि विशेषत: ज्या दिवशी लडाखमधील उपोषणकर्ते कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतरमंतरवरून हटवून रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्या दिवशी तर का नाही चर्चा केली, असा प्रश्न आहे.
यात काही शंका नाही की, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि कॉक्रोज जनता पार्टीला, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या एका अकारण टिप्पणीचा वापर करून, स्वत:ला एका राजकीय पक्षात रूपांतरित करण्याची संधी मिळाली, जरी ती उपाहासात्मक असली तरी. पण आता प्रत्येक जण या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार आहे. सरकार हे कसे हाताळते हे त्यांच्यावर अवलंबून आहे, पण यात काही शंका नाही की, ते पुन्हा एकदा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात अपयशी ठरले. दिल्लीला याची किंमत मोजावी लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार जे काही करत आहे, ते जर आधीच केले असते, तर कदाचित दिल्ली संकट आणि अराजकतेच्या अवस्थेपर्यंत पोहोचली नसती. आज कॉक्रोज जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी मीडिया स्पेस घेतल्यामुळे इतर आंदोलनजीवी आणि विरोधक चिंताग्रस्त झालेले आहेत. आपल्यावरचा कॅमेरा हटल्यामुळे ते त्या आंदोलनात घुसून आपला पाठिंबा दर्शवत आहेत. यातून अराजकता वाढत आहे. त्यामुळे सरकारने आता कठोर पावले उचलून या आंदोलनजीवींना थांबवले पाहिजे.