वंदे मातरम् या राष्ट्रगीताभोवतीचा वाद ज्या मर्यादेपर्यंत वाढत आहे, ते केवळ चिंताजनकच नाही, तर दुर्दैवीही आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात ‘वंदे मातरम्’ गायले जात असल्याचा प्रसंग अस्वस्थ करणारा आणि धक्कादायक होता. हे खरे आहे की काँग्रेस कार्यालयात संपूर्ण ‘वंदे मातरम’ गायले गेले, परंतु व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, सोनिया गांधी गाणे मध्येच थांबवण्यासाठी हातवारे करत आहेत आणि काहीतरी विचित्र घडल्याने अस्वस्थ दिसत आहेत. गाण्याची जबाबदारी असलेले ललित देसाई, राहुल गांधी आणि इतर नेत्यांकडे जाताना दिसतात. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांचे हे विधान आहे की, खर्गे बराच वेळ उभे होते आणि सोनिया गांधी खुर्ची मागत होत्या, हे हास्यास्पद होते. तीन मिनिटांच्या गाण्यादरम्यान खर्गे यांना खुर्चीची गरज कशी वाटली? हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यानंतर खर्गे उभे राहिले आणि त्यांनी आपले भाषण दिले.
जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले की, २८ आॅक्टोबर १९३७ रोजी कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम्चे फक्त सुरुवातीचे श्लोक गायले जातील असे ठरले होते आणि तेव्हापासून ही काँग्रेसची परंपरा आहे. वंदे मातरम्ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’च्या बरोबरीचा दर्जा देणारा आणि त्यात व्यत्यय आणणाºया किंवा त्याचा अपमान करणाºयाला शिक्षा करणारा कायदा नुकताच मंजूर झाला असूनही, ही परंपरा पाळण्याचा आग्रह कायम आहे. काँग्रेसने या कायद्याशी संबंधित विधेयकावरील चर्चेवर बहिष्कार टाकला. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी वंदे मातरम्च्या पूर्ण गायनात अडथळा आणल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी होत आहे. तथापि, आता राहुल गांधींच्या अनधिकृत नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेस पक्षात वंदे मातरम्प्रति भक्तीला जागाच उरलेली दिसत नाही. जेव्हा ते आपली चूक मान्य करायलाच तयार नाहीत, तेव्हा माफी मागण्याचा प्रश्नच कसा उद्भवतो? स्वातंत्र्य चळवळीदरम्यान सर्व विचारधारा आणि संघटनांच्या संघर्षासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करणारी काँग्रेस आज भारताच्या राष्ट्रगीताचे खरे स्वरूप स्वीकारायला तयार नाही, हे आश्चर्यकारक आहे.
१८९६ ते १९३६ पर्यंत, काँग्रेसच्या सर्व अधिवेशनांमध्ये वंदे मातरम् पूर्णपणे गायले जात असे आणि प्रत्येक जण ते गात असे. हळूहळू, मुस्लिमांच्या एका गटाचा याला विरोध वाढू लागला आणि काँग्रेसच्या अधिवेशनात उभे राहूनही त्यांनी ते गाण्यास नकार दिला. अत्यंत जातीयवादी असलेल्या आणि भारताच्या फाळणीची मागणी करणाºया मुस्लीम लीगच्या दबावाखाली, १९३७ मध्ये ते संक्षिप्त करण्यात आले. जयराम रमेश आणि इतर काँग्रेस नेते, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा हवाला देऊन, असा दावा करतात की हे त्यांच्या सूचनेनुसार करण्यात आले. ते हे सांगायला विसरतात की, पंडित नेहरू आणि इतर अनेक नेत्यांनी दबावाखाली येऊन, हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या हितासाठी मुस्लिमांना ज्या ओळी मान्य नव्हत्या त्या वगळल्या पाहिजेत, असा आग्रह धरल्यानंतर त्यांनी ही सूचना केली होती. तोपर्यंत जीना आणि काँग्रेसमधील इतर मुस्लीम नेत्यांनी आपली भूमिका बदलली होती. त्यामुळे, कदाचित असे केल्याने त्यांचे मन वळेल, असा विचार करण्यात आला. सत्य हे आहे की, त्यांना संपूर्ण गाण्यावरच आक्षेप होता आणि आजही मुस्लिमांचा एक गट ‘वंदे मातरम्’ अस्वीकार्य मानतो. काँग्रेस याच गटापुढे शरणागती पत्करत आहे.
केरळमध्ये काँग्रेस मुस्लीम लीगसोबत निवडणुका लढवते आणि सरकारचा भाग असल्याने, तिथे राष्ट्रगीत गायले गेले नाही. कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये अशी परिस्थिती नाही, म्हणूनच तिथे ते गायले गेले. याकडेही दुर्लक्ष करता कामा नये की, प्रियांका गांधी वद्रा सध्या केरळमधील वायनाडच्या खासदार आहेत, त्यांनी मुस्लीम लीगच्या पाठिंब्याने विजय मिळवला आहे. काँग्रेस मुस्लीम लीगचे लांगूलचालन करत असल्याचे दाखवत आहे. १९०७ मध्ये मुस्लीम लीगच्या स्थापनेनंतर वंदे मातरम्ला विरोध सुरू झाला. विडंबना म्हणजे, मुस्लिम लीगनेच भारताची फाळणी केली, तरीही काँग्रेस त्यांच्या दबावाखाली घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे समर्थन करत आहे. जेव्हा २४ जानेवारी १९५० रोजी वंदे मातरम्चे संक्षिप्त रूप राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले, तेव्हा फाळणीनंतर संसदेतील आणि संसदेबाहेरील प्रभावशाली पक्षांनी आणि नेत्यांनी सरकारवर पूर्ण गीत पुन्हा समाविष्ट करण्यासाठी दबाव आणला नाही. यापूर्वी, ते संसदीय अधिवेशनाच्या सुरुवातीला किंवा शेवटीही गायले जात नव्हते. जेव्हा भाजप सत्तेवर आला, तेव्हा लालकृष्ण अडवाणी आणि राम नाईक यांनी संसदेत हे गीत गाण्याची परंपरा सुरू केली.
गेल्या सात-आठ वर्षांपासून, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समुदायांमधील कट्टरपंथी घटक, अतिरेकी डावे, अतिसमाजवादी आणि भारताला एक विखंडित भूभाग मानणाºयांच्या विचारसरणीचा पाठपुरावा करत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचा असा विश्वास आहे की, भाजपसोबतच्या संघर्षातील तिची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्या शक्ती आहेत, ज्या भारताला एक प्राचीन राष्ट्र म्हणून स्वीकारत नाहीत, ज्या वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादींना इतिहास किंवा खरे ग्रंथ मानण्यास विरोध करतात आणि ज्या सनातन धर्म किंवा त्याच्या प्रतीकांना अंधश्रद्धा किंवा प्रगतीविरोधी मानतात. सत्य हे आहे की, आता हेच लोक काँग्रेसची विचारसरणी ठरवतात. काँग्रेसची ही भूमिका चुकीचीच नाही तर देशविरोधी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.