Thursday, February 5, 2026
spot_img

प्रत्येक थेंब वाचवण्याची गरज

             यंदा होळीपूर्वीच वातावरणात उकाडा जाणवू लागला. आता जेवढी उष्णता वाढेल, तेवढी पिण्यासाठी, आंघोळीसाठी, शेतात आणि कारखाने इत्यादीसाठी पाण्याची मागणी वाढेल. पृथ्वीवरील पाण्याची गरज पावसाने किंवा हिमनद्यांद्वारे पूर्ण होते. अनियंत्रित उष्णतेमुळे या दोन्ही जलस्रोतांचे गणित बिघडत चालले आहे. हवामान बदलाच्या तीव्र परिणामामुळे आता पावसाळा अनिश्चित झाला आहे. आतापर्यंत बहुतांश लहान नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्याचा थेट परिणाम तलाव, विहिरी, कालवे आणि जलसाठ्यांवर दिसून येतो.

देशातील पाण्याचे अत्याधिक शोषण आणि अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. परिणामी आगामी काळात देशाला भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत या जलसंकटाला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. तयारीसाठी कोणतेही क्लिष्ट सूत्र नाही. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेले प्रयत्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत. विशेष म्हणजे होळीच्या अगोदर काही दिवस सहा महिने पुरेल इतका जलसाठा धरणांमध्ये आहे असे वृत्त येते. चारच दिवसांनी पाण्याची घट झाल्याचे सांगितले जाते. उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे न वापरता पाणी आटताना दिसते.

जगाच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के लोकसंख्या भारतात आहे, तर देशात फक्त चार टक्के पिण्यायोग्य जलस्रोत उपलब्ध आहेत. जल गुणवत्ता निर्देशांकात १२२ देशांपैकी भारत १२०व्या क्रमांकावर आहे आणि देशातील सुमारे ७० टक्के जलस्रोत प्रदूषित आहेत. जलसंसाधन मंत्रालयाच्या मते, २०५० सालापर्यंत आमची पाण्याची गरज १,१८० अब्ज घनमीटर होण्याची शक्यता आहे. देशातील पाण्याची सध्याची उपलब्धता १,१३७ अब्ज घनमीटर आहे. २०३०पर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार नाही.

भारताचे ग्रामीण जीवन आणि शेती वाचवायची असेल तर पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याशिवाय पर्याय नाही. अवाढव्य बजेट, मदत, कूपनलिका हे शब्द जलसंकटावर उपाय नाहीत, हे अनुभवावरून दिसून येते. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली धरणे शंभर वर्षेही टिकत नाहीत, तर आपल्या पारंपरिक ज्ञानाने बांधलेल्या जलसंरचना आजही दुर्लक्षित आणि उदासिनतेच्या पाण्याने भरलेल्या आहेत. जरा जास्त पाऊस पडला तर पाणी साठवण्यासाठी कोणतेही साधन उरले नाही आणि कमी पाऊस झाला तर कामाला चालना मिळेल असा कोणताही राखीव साठा उपलब्ध नाही हे आपल्या देशाचे नशीब आहे. देशाच्या मोठ्या भागासाठी अपुरा पाऊस होणे ही काही नवीन गोष्ट नाही किंवा तेथील समाजाला कमी पाण्यात जगणेही नवीन नाही, परंतु गेल्या पाच दशकांत आधुनिकतेच्या झंझावातात गाडले गेलेले हजारो तलाव आणि पारंपरिक जलप्रणाली यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.

मध्य प्रदेशातील तीन लाख लोकसंख्येचे शहर असलेल्या बुºहाणपूरमध्ये १६१५ मध्ये तयार केलेल्या प्रणालीद्वारे दररोज सुमारे १८ लाख लिटर पाणी वितरित केले जाते. या प्रणालीला ‘भंडारा’ म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी देश, काळ आणि परिस्थितीनुसार पावसाचे पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती विकसित आणि जतन केल्या होत्या. प्रत्येक घराच्या अंगणात एकेकाळी विहीर हे घरगुती गरजांसाठी, म्हणजे पिण्याचे पाणी आणि स्वयंपाकासाठी शुद्ध पाण्याचे स्रोत होते.

हरियाणा ते माळवापर्यंत जोहर हे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक रचना आहेत. पावसाचे पाणी वाहून जाणाºया भागात पाणी साचण्यासाठी हे सहसा नैसर्गिक किंवा कृत्रिम धरणांसह लहान तलावांचे रूप धारण करतात. पाट, उंच उतारावर पाण्याचा प्रवाह थांबवण्याची पद्धत डोंगराळ भागात खूप लोकप्रिय आहे. नाडा किंवा बंधा ही कालव्याद्वारे किंवा नाल्याद्वारे पाणी काँक्रिटच्या बांधापर्यंत वाहून नेण्याची व्यवस्था आता दिसत नाही. तलाव आणि पायरी विहिरी हे केवळ जलसंवर्धनाचे साधन नसून ते आपल्या स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरणही आहेत. आज अशा पारंपरिक व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष योजना करण्याची गरज आहे आणि त्याची जबाबदारी स्थानिक समाजावर टाकली पाहिजे. साताºयातील लिंब गावातील शिवकालीन बारा मोटेची विहीर ही एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. असे काहीतरी कायमस्वरूपी करणे गरजेचे आहे.

जेव्हापासून हा देश आणि जग अस्तित्वात आहे, तेव्हापासून पाण्याची अत्यावश्यक गरज आहे. कमी पाऊस आणि वाळवंट यांसारख्ये वैचित्र्य निसर्गात आहेत. गेल्या दोनशे वर्षांपासून उपासमारीने किंवा पाण्यामुळे आपल्या वडिलोपार्जित घरातून स्थलांतरित झालेल्या लोकांच्या कथा ऐकायला मिळतात. त्यापूर्वीच्या समाजाकडे प्रत्येक प्रकारच्या जलसंकटावर उपाय होता. समस्या अशी आहे की, आज गावे आणि शहरांमध्ये बांधल्या जात असलेल्या योजनांमध्ये पाण्याचा वापर आणि प्रवाह किती आहे याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. आमच्या डोळ्यांसमोरून, घरांच्या अंगणांतून, गावातील तळी आणि शहरांतील सार्वजनिक ठिकाणी विहिरी गायब झाल्या आहेत. पायरी विहिरी पचवण्याचे कामही स्वातंत्र्यानंतरच झाले. त्याचप्रमाणे कर्नाटकातील करे, तामिळनाडूतील अरी, नागालँडमधील जॉबो, लेह-लडाखमधील जिंग, महाराष्ट्रातील पट, उत्तराखंडमधील गुल, हिमाचलमधील कुल आणि जम्मूमधील कुहल या पारंपरिक जलसंधारणाच्या पद्धती होत्या, ज्या आधुनिकतेच्या वादळात कुठेतरी हरवल्या होत्या. आता भूगर्भातील गाळ काढण्याचे आणि नद्यांवर बंधारे बांधण्याचे प्रयत्न अयशस्वी होताना दिसत असताना पुन्हा त्यांची आठवण होत आहे.

एकूणच, केवळ पाण्याचा हुशारीने खर्च करणे आवश्यक नाही, तर आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी पारंपरिक जलसंधारण प्रणालींचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. या प्रणालींमुळे केवळ पाण्याची बचत होणार नाही, तर पृथ्वीच्या वाढत्या तापमानावरही नियंत्रण राहील. हिरवाई, गुरांसाठी चारा, मासे आणि अन्नासाठी इतर पाण्याच्या फळांच्या रूपात त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल.

आणखी वाचा

8 COMMENTS

  1. Frev looks like another one of those all-in-one gaming sites, but this one is packed with games that run well even on slower connections. I liked diving into the catalog of games here. Try checking it out : frev

  2. Trying to log into Luvabet and this login page seems pretty straightforward. No weird glitches or redirects like some other sites I’ve used! That’s always a win! Fingers crossed the rest of their site is as smooth and reliable. Time to log-in : luvabetlogin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी