Monday, June 16, 2025
spot_img

बेगर्स इकॉनॉमी

 

 

गेली अनेक वर्ष मंदिरात म्हणा किंवा रस्त्यावर, सिग्नल, रेल्वे लाइन, फुटपाथ अशा ठिकाणी जेव्हा आपण हिंडतो तेव्हा आपल्याला एका ठराविक प्रकारचे भिकारी हे दिसत असतात. येणाºया-जाणाºया प्रत्येकाच्या ते पाया पडत असतात, थाळी पुढे करून भीक मागत असतात. काही लोक त्यांना पैसे देतात. कोणी रुपाया, कुणी दोन रुपये, कुणी जास्तीही औदार्य दाखवते. एखादी दहा रुपयाची नोटही टिकवते, पण हे चित्र आपण अनेकवेळा पाहतो, पण यामागे एक फार मोठी अर्थव्यवस्था आहे यादृष्टीने आपण कधीच बघत नाही. किंबहुना हे भिकारी नाहीत, तर हा एक पेशा आहे हे आपल्याला कधीच समजत नाही, पण हे कळायला नवीन वर्षाचा पहिला दिवस उजाडला.

मला खरं तर कुणालाही भीक द्यायला आवडत नाही. कुणीतरी दयेच्या केविलवाण्या नजरेने आपल्याकडे पाहावे आणि आपण त्याच्याकडे एक नाणे टाकावे हे त्याचा, आपला आणि त्या पैशाचाही अपमान आहे असेच मला वाटत आले आहे, पण माझा हा समज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खोटा ठरला आणि त्या बेगर्स इकॉनॉमीचा मला अर्थ कळला.

रस्त्याने जाताना माझ्या पुढे एक माणूस होता. मला नाव माहिती नाही, पण नेहमी जाण्या-येण्यातला तोंड ओळखीतला होता. त्या दानशूर व्यक्तीला अशा भिकाºयांना पैसे वाटताना, कुठे कुत्र्यांना बिस्किटे भरवताना मी अनेकवेळा पहायचो. त्यामुळे आता नवीन वर्षाची हा सद्गृहस्थ त्याला काय भीक देतो हे पाहण्यासाठी मी रेंगाळलो. त्याने खिशात हात घातला अन् ओशाळल्यासारख्या त्या परिचित भिकाºयाला म्हणाला, ‘सॉरी नो चेंज टुडे’. ‘आज सुटे पैसे नाहीत’. त्यावर तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, ‘आॅनलाइन पेमेंट करा, पेटीएम केले तरी चालेल’. आता माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. अरे हा तर ग्लोबल भिकारी आहे यार… बघत बसलो पुढे काय घडते आहे. त्या सद्गृहस्थाने मोबाइल बाहेर काढला तसा त्या भिकाºयाने आपल्या हातातली थाळी उलटी केली, त्या थाळीच्या पाठीवर क्यूआर कोड होता. तो त्या सद्गृहस्थाने स्कॅन केला आणि क्षणात आवाज आला ‘पेटीएम पर दो रुपये प्राप्त हुए’.

हा माझ्यासाठी धक्का होता. भिकारी म्हणजे गरीब, अज्ञानी, न शिकलेले असे मी समजत होतो, पण काळानुसार शिळा भाकर तुकडा न मागता तोही कॅशलेस ट्रान्झेक्शन करू लागला आहे? खरंच ही प्रगती आहे का अधोगती आहे मला समजेनासे झाले. शिकलेला कार्पोरेट जगतातील हा भिकारी आहे की नक्की काय हे समजेनासे झाले. म्हणून त्या सद्गृहस्थालाच गाठले आणि विचारले अगदी स्पष्टपणे. तेव्हा समजलेले वास्तव मेंदूला झिणझिण्या आणणारे होते.

हा भिकारी आपला पिढीजात व्यवसाय म्हणून भीक मागण्याचं काम करत आहे. आज तो साठीच्या पुढचा आहे, पण त्याची आई दारोदार जाऊ न ‘वाढ गं माये’ अशाप्रकारे भाकर तुकडा मागून मुलांना वाढवत होती, तर बाप रस्त्यावर भीक मागून संसार चालवत होता. मुलगा थोडं फार शिकला, पण नोकरी मिळवण्यात वेळ न घालवता आईबापाच्या धंद्यातच पडला. थोडा शिकलेला असल्याने आपली कमाई कशी वाढवता येईल याचा प्रयत्न त्याने केला. भाकर तुकडा, शिळंपाकं असं काही आईनं आणलं तर आता ते आपण कुणी खायचं नाही, पण मिळेल तेवढं आणायचं हे त्यानं ठरवलं. पाटी पाटी भाकर तुकडे, चपात्या, भात, विविध प्रकारची कालवणं ती रोज घेऊ न यायची, पण त्या अन्नाचं नंतर सॉर्टिंग करून त्यातलं चांगल अन्न असेल तर भटक्या गाई, गुरांना देण्यासाठी, अन्य टाकाऊ असेल त्याचा उपयोग एका खड्ड्यात टाकण्यासाठी केला जात असे. त्या खड्ड्याच्या बाजूलाच हा मुलगा भीक मागायचा, पण फक्त चार-आठ आणे ते रुपाया. रोख रकमेची भीक. अशा तºहेन आई, मुलगा, बाप भीक मागून सुखासमाधानाने सधन होत होते. पुढे या मुलाचे लग्न झाले, मुलं झाली, ती चांगली शिकली. एक इंजिनिअर झाला, एक पदवीधर झाला. मुलीचे लग्न झाले, पण हा व्यवसाय त्याने चालूच ठेवला.

काळानुरूप गेल्या काही वर्षांत लोक कॅशलेस झालेले आहेत. प्लॅस्टिक मनी वापरत आहेत. कार्ड स्वाइप करू लागले. आॅनलाइन बँकिंग करू लागले. पेटीएम आलं, गुगल पे आलं. लोक रोख रक्कम पैसे खिशात बाळगेनासे झाले. रिक्षावाले, पानाची टपरी, चहाची टपरी प्रत्येक ठिकाणी पेटीएम आले. ‘मेरा देश बदल रहा है’ म्हणत प्रत्येक जण बदलत गेला. खिशात एक स्मार्ट फोन असला की, अख्खी बँक बरोबर घेऊ न तुम्ही जाता. सगळं पेपरलेस झालेलं आहे. मग पैशाच्या पाकिटाची गरज लागत नाही. मग सुट्टे पैसे खुळखुळण्याचे दिवस संपले. मग यांना भीक कशी मिळणार? साहजिकच, शिकलेल्या या भिकाºयांनी स्मार्टफोन घेतले आणि झाले कार्पोरेट भिकारी. तुमच्याकडे सुटे पैसे देण्यासाठी नाहीत आम्हाला माहिती आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जनधन योजनेसारख्या योजनेतून देशातील प्रत्येक गरीबाचेही बँक अकाऊं ट असले पाहिजे, असे काही वर्षांपूर्वी आवाहन केले. झीरो बॅलन्सनी खाते उघडण्याचे आव्हान त्यांनी केले. त्यामुळे लाखो गोरगरीब बँक अकाऊं ट होल्डर झाले. त्यात भिकारीही आपली खाती उघडू लागले. या खात्यांवर असलेल्या सर्व सुविधा भिकारी घेऊ लागले. आता लॉकडाऊ नच्या काळात बाहेर पडता येईना. अशावेळी वर्क फ्रॉम होम करावे लागले. त्यावेळी अनेकांनी स्मार्टफोन सेकंड हँड का होईना घेतले आणि अनलिमिटेडचा पॅक मारून फोनवरून भिकेची याचना कराला सुरुवात केली. मग भीम अ‍ॅप, यूपीआय सगळं घेतलं आणि हे भिकारी कार्पोरेट झाले. आता या अवताराकडे बघून भिकारी वाटणं स्वाभाविक आहे, पण कार्पोरेटमधील आयटी क्षेत्रातील कितीतरी तरुणांचे चेहरे पाहिले तर त्यांनी वाढवलेली दाढी, दिलेले केसांचे अस्ताव्यस्त आकार हे पाहता यापेक्षा वेगळे लूक ते नाहीत असेच वाटते.

ही सगळी बेगर्स इकॉनॉमी पाहून माझे डोळे गरगरायला लागले. देश खरंच आपली प्रगती करतो आहे, पण मध्यमवर्गीय माणूसच अडाणी आणि गरीब होत चाललेला आहे. अजूनही त्याला कॅशलेस व्यवहार करायला भीती वाटते. लाइनमध्ये उभे राहूनच विजेचे बिल भरायचे आहे. बँकेत जाऊ न चेकनेच पैसे हवे आहेत, पण त्या तुलनेत हे भिकारी लोक सुधारले आहेत. तरीही मनात एक शंका आली म्हणून त्या सद्गृहस्थाला विचारले, ‘या माणसाची मुलं शिकलेली आहेत, पदवीधर आहेत, तरीही हा भीक का मागतो?’ त्यावर हसत तो सद्गृहस्थ म्हणाला, ‘मुलांना नोकºया नाहीत ना? दरवर्षी कोट्यवधी रोजगार देणार असे पंतप्रधानांनी आश्वासन दिले होते. त्यावर सगळे डोळे लावून बसले आहेत. म्हणून बँकेत खाती उघडली, कॅशलेस झाले, आता कधीतरी रोजगारही सरकार निर्माण करेल. तोपर्यंत भीक मागणे हाच एक व्यवसाय आहे. तो ‘कर्मण्येवाधिका रस्ते’ या ध्येयाने करतो आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी